ताज्या घडामोडी

सभासद व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य केल्यास समाजाची प्रगती होईल

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सभासद व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करावे. असे काम केले तर निश्चितपणे गाव आर्थिक स्थितीने मजबूत होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
वाकुर्डे खुर्द येथील सेवा सोसायटी नूतन संचालक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. विश्वास कारखाना संचालक डॉ. राजाराम पाटील, वारणा कारखाना संचालक विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रणधीर नाईक पुढे म्हणाले, सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील प्रमुख मान्यवरांनी प्रयत्न केले होते. परंतु काही लोकांच्या हट्टापायी गावाला निवडणुकीस सामोरे जावे लागले. या निवडणुकीमधून निश्चितच विरोधकांना धडा शिकायला मिळेल. नूतन पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी संघटित होऊन नवनवीन उपक्रम राबवावेत. संस्थेची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील रणधीर नाईक यांनी शेवटी केले.
प्रारंभी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते शामराव खिलारे, गजानन पाटील, यशवंत जाधव, आनंदा जाधव, मारुती कांबळे, भगवान जाधव, यशोदा पाटील, लक्ष्मी पाटील, शिवाजी पावणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उत्तम निकम, बंडा डांगे, विजय महाडिक, सर्जेराव जाधव, रणजित कांबळे, विजय जाधव, सचिन यादव, दिपक पाटील, संजय जाधव, मारुती पाटील, तानाजी पाटील, राजेंद्र मेंढकर, सचिन सवादकर, बाबा जाधव, पांडुरंग पाटील, युवराज जाधव, मोहन गुरव, राहुल कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!