वाटद रायवाडी जि.प.शाळेच्या कंप्पाउनला तडे शाळेला धोका
खंडाळा – रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावातील जि.प.मराठी शाळा रायवाडीच्या संरक्षण भिंतीला दोन वर्षी पूर्वी तडे गेले आहे. शाळा धोकादायक असून सुद्धा आज तागायत दुरुस्ती झाली नाही गावातील ग्रामंस्थानी जि.प.सदस्या ऋतूजा जाधव मँडम यांच्याशी संपर्क केला .त्या नंतर संबंधीत अधिकारी येवून पहानी करुन त्या संरक्षण भिंतीचे इस्टीमेंट केले त्या वेळेस दोन वर्ष होवून सुद्धा जि.प.रत्नागिरी चा एक हि अधिकारी शाळेपर्यंत पोहोचला नाही . त्या संरक्षण भिंतीवर मुलामुलींचे शौचालय आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे याचा सुद्धा विचार व्हावा, म्हणून गावच्या ग्रामंस्थानची नाराजी आहे .तरी सुद्धा गावातील लोकांनी श्रमदान करुन त्या संरक्षण भिंतीला कच्चा स्वरुपाचा बांध घातला आहे . तरी शाळेतील मुलांचा विचार करुन तात्काळ संरक्षक भिंतीचे काम करण्यात यावे असे वाटद गावातील ग्रामंस्थानची मागणी आहे