ताज्या घडामोडी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सांगली,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Spread the love

इस्लामपूर दि.१० प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सांगली,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान आठ महिला कामगार व कामगारांच्या पत्नींचा जागतिक महिला दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मान करण्यात आला. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्य क्षा सुस्मिता जाधव,जिल्हा उपाध्यक्षा अलका माने,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सुवर्णा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सांगली गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार,इस्लामपूर कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक पियुष पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील केंद्राच्या सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.
सौ.सुस्मिता जाधव म्हणाल्या,महिलांनी केवळ एक दिवस नव्हे,तर वर्षभर महिला दिन साजरा करावा. मुले आणि मुली असा भेद करू नका. आपण सावित्रीच्या लेकी आहोत,जिजाऊ माताप्रमाणे संस्कारक्षम पिढी घडवूया. आपण सासू-सासऱ्यांचा चांगला सांभाळ करा,म्हणजे मुलेही आपला चांगला सांभाळ करतील. यावेळी सौ.सुवर्णा पाटील,सौ.अलका माने यांच्यासह सत्कार मूर्तींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीराम बझार फलटण च्या कर्मचारी सौ.संगिता भोईटे,क्रांती साखर कारखान्याच्या कर्मचारी पत्नी माया पोळ,सांगली एस टी महामंडळाच्या कर्मचारी स्वातीमित्रा कांबळे,हुतात्मा बझार च्या कर्मचारी शैलजा साळुंखे,राजारामबापू साखर कारखाना कर्मचारी पत्नी सौ.सुजाता बाबर,मन मंदीर पतसंस्थेच्या कर्मचारी पत्नी सौ.संगिता गायकवाड,तासगाव एस टी महामंडळाच्या कर्मचारी पत्नी सौ.शुभांगी साळुंखे,तासगाव सूत गिरणी च्या कर्मचारी पत्नी सौ.पूनम माळी यांचा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शाल,श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
प्रारंभी सांगली गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी स्वागत प्रास्ताविक भाषण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. इस्लामपूर कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक पियुष पाटील यांनी आभार मानले.
यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,सौ.उज्ज्वला भोई,अभिजित भोई,गणेश कुंभार,आक्काताई डांगे यांच्या सह राजारामबापू सहकारी साखर कारखाना कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.राजारामनगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. समवेत सौ.सुस्मिता जाधव,सौ.सुवर्णा पाटील,सौ.अलका माने,संभाजी पवार,पियुष पाटील,सौ.उज्ज्वला भोई व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!