ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास केला तर त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत निश्चित यश मिळू शकते ; चंद्रकांत मोरे
मायणी दि 30 (वार्ताहर ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती सारख्या शालेय स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास केला तर त्यांना निश्चित मिळू शकते असा विश्वास प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, सातारा चे संचालक, चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केला.
ते नव महाराष्ट्र विद्यालय चितळी ता खटाव येथे खटाव तालुका शिक्षक समिती च्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते .अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी. ए. साठे हे होते.यावेळी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या कु. अपूर्वा राजाराम पवार व एन एम एम एस (सारथी)शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अस्मिता राजाराम पवार,चित्रकला स्पर्धेत राज्य स्तरावर यश मिळविणाऱ्या अशोक दीपक रायबोले व खटाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या संजय पाटोळे यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या बी एन कोळेकर, जी. जी. जाधव, व्ही.डी. हांगे,आर.डी. जगदाळे यांचा शाल श्रीफळ,फेटा पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देवून सत्कार सत्कार करण्यात आला.
यावेळी राजाराम पवार, अमोल निकाळजे,राजाराम गायकवाड संजय पाटोळे,संतोष डोंबे,विजयसिंह भोसले जयवंत नलवडे,किरण गोडसे, राजन घोसपूरकर,एस बी रायनाडे, यु.बी.जाधव उपस्थित होते.केंद्र संचालक रमजान इनामदार यांनी आभार मानले . खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत एश मिळविणाऱ्या कु. अपूर्वा पवार व एन एम एम एस (सारथी)शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या अस्मिता पवार,चित्रकला स्पर्धेत यश मिळविणाऱ्या अशोक दीपक रायबोले व खटाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या संजय पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला .