शांतिदूत परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंत पुरस्काराने सन्मानित
मुरुम, ता. उमरगा, ता. १५ (प्रतिनिधी)
समाजात उत्तम कार्य करून इतरांना दिशा दाखविणे हे महान कार्य आहे. इतरांना मदत करणाऱ्यांचा व बंधुभाव जपणाऱ्यांचा हा गौरव आहे. शांतीदूत परिवाराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून केलेला गौरव हा प्रेरणादायी असून येणाऱ्या काळात जोमाने कार्य करता यावे. यासाठी बळ देणारा आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भाऊसाहेब सहकारी बॅंकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले.
उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याची नोंद घेऊन शांतिदूत परिवार महाराष्ट्रच्या वतीने २०२२ चा सेवारत्न पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते रविवारी (ता.१३) रोजी ओम लॉन्स येथे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विट्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते.
यावेळी भाऊसाहेब बिराजदार बॕकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जेष्ठ समाजसेवक डॉ. दामोदर पतंगे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, उद्योजक एल. टी. मोरे, भारत शिक्षण संस्थेचे संचालक सुनिल माने, डॉ. सुभाष वाघमोडे, लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक अशोक क्षीरसागर, शांतीदुतच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव यांच्या उपस्थीतीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. माजी महापौर पवार, डॉ. वाघमोडे,
अँड. शितल चव्हाण, शिवाजीराव वडणे व भुमिपुत्र वाघ यांची भाषणे झाली.
डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. युसुफ मुल्ला यांनी सुत्रसंचलन केले. प्रा. जीवन जाधव यांनी आभार मानले. संतोष जाधव, प्रा. विष्णु शिंदे, गणेश गरुड यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. फोटो ओळ : सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, माजी प्राचार्य शिवमुर्ती भांडेकर, प्रा. अभय कुमार हिरास, अँड. शितल चव्हाण, अभिजीत जाधव, पद्माकर मोरे, प्रदीप चालुक्य, प्रा. डॉ. विष्णु शिंदे, प्रा. गुणवंत जाधवर, सचिन बिद्री, विरभद्र स्वामी, प्रा. शिवाजीराव वडणे यांचा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.