भागशाळा वाटद खंडाळा प्रशालेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक १२/०८/२०२२ रोजी किशोरवयीन मुलींसाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्यसेवीका यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती माधुरी सावंत (CHO) यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले.
तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी व अनिरुद्ध मोटार ट्रेनिंग स्कूल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – हर घर तिरंगा आणि रस्ता सुरक्षितता अभियान अंतर्गत जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला. श्री.पराग ओऊळकर साहेब आणि श्री. जयंत गुरव साहेब तसेच अनिरुद्ध मोटार ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका सौ. अनुराधा जोशी यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूकीचे नियम,परवाने, अपघातग्रस्तांना मदत करणे इत्यादी बद्दल ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. के. जाधव सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जयंत देशमुख सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.