पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या पुढाकारामुळे रोजगार सेवकांचे आंदोलन स्थगित
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामरोजगार सेवक हे जिल्ह्याचा कणा असून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची प्रशासना मार्फत दखल घेतली जाईल. स्थलांतर हा जिल्हयाचा गंभीर प्रश्न असून रोजगाराच्या माध्यमातून स्थलांतर थांबण्यासाठी रोजगार सेवकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक अडचणींवर मात करून त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासित करून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना ग्राम रोजगार सेवकांचे आंदोलन स्थगित करण्यात यश मिळाले आहे.
जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या रोजगार सेवकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ५ डिसेंम्बर रोजी काम बंद आंदोलन करण्यासाठी चे पत्र मनरेगा चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समीर वठारकर यांना पत्र दिले होते.
मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी घेतलेल्या रोजगार सेवकांच्या बैठकीत अध्यक्षांनी दिलेल्या आश्वासना मुळे आम्ही हे आंदोलन मागे घेतो असे रोजगार सेवकांनी जाहीर केले. तसेच पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आमची दखल घेतल्याने आभार व्यक्त केले.यावेळी अति.मु.का.अ.रवींद्र शिंदे, मनरेगा चे समीर वठारकर तसेच सर्व तालुक्यातील रोजगार सेवक उपस्थित होते.