ताज्या घडामोडी

पत्रलेखक संघाचा स्तुत्य उपक्रम !

Spread the love

नुकताच इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा २५ वा (रौप्य महोत्सवी) वर्धापन दिन आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पत्रलेखन पुरस्कार वितरण सोहळा येथील समाजवादी प्रबोधिनीत संपन्न झाला. कालवश आचार्य शांताराम बापू गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली रुजलेली, फुललेली आणि सामाजिक बांधिलकीचा वसा व वारसा जपणारी ही संघटना गेली पंचवीस वर्षे अविरतपणे कार्यरत असून सामाजिक,राजकीय,आर्थिक, सांस्कृतिक आदी प्रश्नांना पदरमोड करून वाचा फोडणाऱ्या वृत्तपत्र पत्रलेखकांचे प्रशिक्षण करण्याबरोबरच त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुकही करते. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी ही वाचकांची पत्रे म्हणजे जनमनाचा आरसाच असतो. रक्तदान शिबिरे, जनजागरण फेरी, विचारवंतांची व्याख्याने आदी उपक्रम राबविणारा हा संघ हळूहळू लुप्त होत चाललेल्या पत्रलेखन कलेचे संवर्धन करत असून नवोदित पत्रलेखकांचे प्रेरणास्थान आहे. संघाच्या कार्यास शुभेच्छा !
प्रा. विजय कोष्टी, सांगली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!