कृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदी भाषेच्या प्रसारासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज ः डॉ. बाळासाहेब सोनावणे..

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हिंदी दिन सप्ताह स्वरुपात साजरा..

Spread the love

हिंदी भाषेच्या प्रसारासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज ः डॉ. बाळासाहेब सोनावणे..
प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हिंदी दिन सप्ताह स्वरुपात साजरा..

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड 21 सप्टेंबरः

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंदी दिवस 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर’ दरम्यान सप्ताहाच्या स्वरूपात साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बाळासाहेब सोनावणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया समवेत उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. जयश्री मुळे, डॉ. रुपा शहा, हिंदी विभागाचे संयोजक डॉ. रविंद्र निरगुडे, प्रा. सुशिल भोंग उपस्थित होते.
हिंदी दिनानिमित्त पोस्टर, लेखन, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तजनार्थ विजयी झालेले पोस्टर स्पर्धेत सुशील साहनी, स्वामीनी आवटे, व्ही. मधुवर्शीनी, जयश्री पुरोहित तर, लेखन स्पर्धेत वैष्णवी देसाई, रोशनी भारती, श्रुती भोसले, संजीवनी केचे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. यावेळी हिंदी कविता, गझल, शेर-शायरीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.

प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब सोनावणे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबर शुद्ध हिंदी भाषेचे अवगत केली पाहिजे. संस्थेने सामुहिक हिंदी दिन सप्ताह स्वरुपात साजरा केला ही कौतुकास्पद बाब आहे. देशाच्या विकासासाठी हिंदी भाषा महत्वाची असून त्यासाठी जास्तीत जास्त हिंदी भाषेचा प्रसार करणे, ही काळाजी गरज आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कांकरीया विद्यार्थ्यांना म्हणाले, हिंदी भाषा ही गोड असून शुद्ध भाषा बोलण्याचा सराव अंगिकारा. हिंदी भाषेतील शेर, शायरी, गझलच्या माध्यमातून भाषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा.

युवकांनी हिंदी भाषेचे महत्व ओळखून भावी काळात एक आदर्श नागरीक घडावे. यावेळी उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे म्हणाल्या, मातृभाषेप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यांना शुद्ध हिंदी लिहीता, वाचता आली पाहिजे. ते करत असताना व्याकरणाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक डॉ. रविंद्र निरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याणी जोशी, रोशनी भारती, अर्जिता बोराटे यांनी तर, आभार डॉ. रूपा शहा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!