ताज्या घडामोडी

डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पत्रकारांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न….

Spread the love

प्रतिनिधी~सौ.मंजुषा पवार.

माण साहित्यिक डॉ.शंकराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि.११ व १२,२०२२ जुलै रोजी डॉ.शंकराव खरात यांची जन्मभूमी असलेल्या आटपाडी शहरांमध्ये प्रथम वर्ष होत असल्याने प्रसारमाध्यमं हे अतिशय वेगवान होत चालल्याने प्रसारमाध्यमांनी या सोहळ्याला सहकार्य करावे असे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्र (अण्णा) देशमुख यांनी सांगितले.बैठकिचे प्रास्ताविक सचिव विलासराव खरात यांनी केले त्यावेळी माणभागातील साहित्यसंमेलना स सर्वांच्या परिश्रमाने न्याय मिळाला पाहिजे असे ते म्हणाले.

प्रारंभी डॉ.शंकराव खरात साहित्य संमेलन २०२२ या साठी तयार करण्यात आलेल्या चिन्हांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पत्रकार हा एक साहित्याचा आत्मा असून सर्व पत्रकार बांधवानी या भव्य साहित्य संमेलनासाठी मोलाची साथ दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.माणदेशी आटपाडी तालुक्यातील पाच साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

त्यामुळे आटपाडी तालुक्यात या प्रथम साहित्यसंमेलनाचे आर्थिक नियोजन जास्त प्रमाणात नसल्याने पुढीलवर्षी नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या वेळी उपस्थित श्रीमंत बाबासाहेब देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी(आटपाडी) येथे डॉ.शंकरराव खरात यांचे सुपुत्र डॉ रविंद्र खरात, साहित्य संमेलन प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात, माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब खरात, जेष्ठ साहित्यिक बा ना धांडोरे, भास्कर भंगाळे, सिताराम सावंत, पत्रकार सादिक खाटिक,किशोर पुजारी, सतिश भिंगे,भरत पाटील, लक्ष्मणराव खटके, सदाशिव पुकळे, दादासाहेब वाक्षे , अंकुश मुढे, सौ.मंजुषा पवार, प्रियांका पारसे.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!