शिराळा तालुक्यातील १४६ कुटुंबांचे भुसख्खलनाचा धोक्यामुळे स्थलांतर.
शिराळा प्रतिनिधी / शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी, मिरुखेवाडी, भाष्ठे वस्ती व धामणकर वस्ती येथील नागरिकांना भू सख्खलनाचा संभाव्य धोका गृहीत धरून आगाऊ काळजी म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे. पाच वाड्यातील १४६ कुटुंबातील ३७९ जणांचा यात समावेश आहे. या सर्वांना करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात स्थलांतरित केले आहे. या स्थलांतरनानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सौ. सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेट ट्रस्ट मार्फत सर्व स्थलांतरित व्यक्तींना ३०० ब्लॅंकेट वाटप, तसेच मुलांना खेळाचे व मनोरंजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार नाईक म्हणाले, प्रत्येक पावसाळ्यात डोंगरालगत असणाऱ्या ज्या वाडी, वस्त्यांना भू सख्खलनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी स्थलांतरित करावे लागते त्यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, कोकरूडचे पी. एस. आई. ज्ञानदेव वाघ, विश्वास चे संचालक कोंडीबा चौगुले, बाबासो बेरडे, एन. डी. लोहार, सावळा पाटील, विजय चौगुले, शिवाजी पाटील, रामभाऊ बदडे, सुजय देशपांडे, वसंत पाटील, मोहन पाटील, शामराव निर्मळ, मिरुखे बुवा, बाबुराव डोईफोडे आदी उपस्थित होते.