महाराष्ट्र

यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने; सरकारची नियमावली जाहीर

Spread the love

मुंबई : यंदाच्या वर्षी गणेश उत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सव देखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. येत्या 7 ऑक्टोबर पासून राज्यभरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे या पार्श्वभूमीवर सरकारने नियमावली लागू केली आहे.

काय आहेत नियम –
1) कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे
2) या वर्षीच्या नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी
3) देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी
4) मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तीचे पूजन करावे
5) मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची समन्वय ठेवावा.
6) गरबा दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे /शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
7) देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईड यावरून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावे.
8) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
9) मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.
10) मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपाणाची व्यवस्था करण्यात सक्त मनाई असेल.
11) देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
12) लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीमधील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
13) दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा.
14) रावण दहना करीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रम स्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलवू नये. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!