ताज्या घडामोडी

निगडी येथील शेतकऱ्यांचा महावितरण उपभियंत्याना घेराव

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
निगडी ( ता.शिराळा ) येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा डीपी दुरुस्ती ची मागणी करूनही दुरुस्ती झाली नाही त्यामुळे उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांना घेराव घातला तसेच मागणी मान्य न झाल्यास वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
येथील शेतकऱ्यांनी २लाख ६५ हजार रुपये भरून १९९७ ला डीपी बसविला होता या डीपी वर वीज वितरण कंपनी ने क्षमतेपेक्षा जास्त वीज जोडणी केली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना गेले दोन महिन्यांपासून शेतीला पाणी मिळालेले नाही त्यामुळे ७ एकर ऊस वाळून गेला आहे. वारंवार मागणी करूनही सदर दुरुस्ती झाली नाही त्यामुळे ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सर्जेराव यादव , वसंत साळुंखे , गणपती साळुंखे , आकाराम साळुंखे , सतीश साळुंखे, प्रकाश साळुंखे , दादासाहेब खोत , बाबा चव्हाण आदी शेतकऱ्यांनी उपअभियंता बुचडे यांना घेराव घातला तसेच निवेदन दिले. तसेच जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!