ताज्या घडामोडी

‘अहमदनगर’ शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

अहमदनगर (Ahmednagar) शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ (Punyashlok Ahilya Devi Nagar) करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.

Spread the love

मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ (Punyashlok Ahilya Devi Nagar) करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.

हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!