नेर्ले नं २ सेवा सोसायटीच्या नूतन संचालकांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन
इस्लामपूर दि.१६ प्रतिनिधी
ही संस्था १०३ वर्षापासून सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देत आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल साडे सहा कोटींच्यावर आहे. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सर्वांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले.
प्रारंभी दिलीपराव पाटील,वसंतराव कदम,अनिता राजाराम पाटील,नंदा मोहन सपकाळ,रामचंद्र दत्तात्रय पाटील,विजयसिंह पाटील,महादेव निकम,दादासो वाठारकर, पोपट कदम, धनाजी साळुंखे,एकनाथ पाटील,प्रमोद मोहिते,नारायण ठोकळे या नूतन संचालकांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.
डॉ.एस.व्ही.पाटील,प्रकाश कदम, पै.अनिल साळुंखे,पवन पाटील,प्रकाश बाबुराव कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.– राजारामनगर येथे स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना नेर्ले नं.२ सेवा सोसायटीचे संचालक. समवेत संजय पाटील, दिलीपराव पाटील व कार्यकर्ते.