कामेरी गावच्या ग्रामपंचायत व सखी मंच ने विधवा महिलांची ओटी भरुन त्यांना हळदी कुंकू लावून समाजात सुहासिनीचा दिला मान
प्रथमेश क्षीरसागर- इस्लामपूर प्रतिनिधी
इस्लामपूर दि.१८ सांगली जिल्ह्यातील कामेरी गावच्या ग्रामपंचायत व सखी मंच ने विधवा महिलांची ओटी भरुन त्यांना हळदी कुंकू लावून समाजात सुहासिनीचा मान दिला. मंचच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना रणजित पाटील यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला.
येथील ग्रामपंचायत व सखी मंच कामेरी चे संयुक्त विद्यमानाने विधवा प्रथा बंद हा कार्यक्रम पार पडला दोनशे विधवा महिलांना हळदी कुंकू व साडी देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा सौ. सुस्मीता जाधव महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळवा तालुका अध्यक्षा सौ. सुनिता देशमाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. सुरेखा जाधव, सौ. सविता पाटील सरपंच सौ. स्वप्नाली जाधव सौ. सुजाता पाटील विमल पाटील यांची भाषणे झाली
या कार्यक्रमाचे संयोजन उपसरपंच योगेश पाटील सदस्य श्री. पोपट कुंभार ग्रामविकास अधिकारी आनंद पवार यांनी केले स्वागत सरपंच सौ.स्वप्नाली जाधव यांनी केले तर सौ. सुजाता पाटील यांनी आभार मानले.यावेळी स्वप्ना पाटील म्हणाल्या कामेरी गाव हे क्रांतिकारकांचा गाव आहे येथे नेहमी क्रांती घडते विधवा प्रथा बंद झाली पाहिजे असे ग्रामपंचायतीत ठराव करून फक्त चालणार नाही तर जुन्या रुढी परंपरा बाजूला सारून अशा महिलांना प्रत्यक्षात सुवासिनीचा मान दिला पाहिजे आम्ही याची सुरुवात आमच्या गावापासून केली आहे.