ताज्या घडामोडी

ओरी गावचे उद्योजक सुशिल देसाई यांना पितृशोक

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर:-
रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व गावचे माजी सरपंच गंगाराम विश्राम देसाई यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ओरी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ओरी गावचे प्रसिद्ध उद्योजक सुशिल देसाई यांचे ते वडील होत.
गंगाराम विश्राम देसाई अत्यंत करारी, अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व होते. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली होती. ते मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद होते.
शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कामात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यांनी गावातील सरपंचपदही अतिशय धाडसाने आणि नेटानं भूषवले.गावात विकास कामांसाठी त्यांचे योगदान फार मोलाचे ठरले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे ,दोन मुली,सूना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै.गंगाराम देसाई यांच्या गुरूवारी सकाळी निघालेल्या अंत्ययात्रेत ओरी पंचक्रोशीतील तसेच रत्नागिरीसह जाकादेवी बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक, उद्योजक, हितचिंतक, मराठा समाजातील मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै.गंगाराम देसाई यांना जाकादेवी विद्यालय व मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!