कारंदवाडी ग्रामपंचायतीचे मळे भाग विकासाकडे दुर्लक्ष घाणीचे साम्राज्य नागरिक आंदोलनाच्या तयारीत – तात्यासाहेब उर्फ बंडू कोळेकर
वाळवा तालुक्यातील कारंदवाडी ग्रामपंचायत मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य तसेच मळे भागांची रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यात या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे जर ग्रामपंचायत तिने लवकरात लवकर गाव स्वच्छ तसेच मुळे भागातील रस्त्यांची केली नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजप युवा नेते तात्यासाहेब उर्फ बंडू कोळेकर यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले लवटे मळा ते बंडू कोळेकर मळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे तसेच सध्या शाळा सुरू आहेत या मराठी शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य झाले असुन ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे ग्रामपंचायती कडुन गावातील विकास कामांना खीळ बसली असुन ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य पसरल्या मुळे गावातील सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात या यासंदर्भात विचारपूस करण्यास गेलो असता कार्यालया कडून उडवा उडवीची उत्तरे आणि गावच्या नेत्यांच्या कडून दमदाटीची भाषा वापरली जात आहे. ग्रामपंचायतीकडून मळे विभागातील रस्ते तसेच स्वच्छता केली नाही तर ग्रामपंचायत समोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली.यावेळी ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे नेते शंकर हाके, माजी ग्रा. प.सदस्य रमेश हजारे,आनंदा माणवर, मिथुन आवटी, संकेत आवटी, अमोल जाधव उपस्थित होते.