*जनकल्याण फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – श्री.दर्शन जोशी
” अनेक व्यक्तींचा मिळूनच समाज बनतो.समाजाच्या जडणघडणीत सामाजिक संघटनांचे योगदान मोलाचे असते.जनकल्याण फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे” असा मोलाचा संदेश संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दर्शन जोशी यांनी दिला.तारळे खुर्द येथील जनकल्याण फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
नुकतेच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दर्शन जोशी यांच्या हस्ते तारळे खुर्द ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील नोंदणीकृत सामाजिक संस्था जनकल्याण फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.शांताराम किरुळकर, उपाध्यक्ष श्री.संजय आसणेकर ,श्री.सर्जेराव पाटील, श्री.रणजीत ढवण,आदी उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करुन तसेच जनकल्याण फाऊंडेशन कमिटीचे सदस्य श्री.सर्जेराव पाटील व खजिनदार श्री.प्रदीप पाटील यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊन करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री.संजय आसणेकर यांनी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन केले.श्री.सर्जेराव पाटील यांनी तारळे पंचक्रोशीतील सर्व गावांसाठी जनकल्याण फाऊंडेशन हे एक आशास्थान असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय आसणेकर यांनी केले.दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष भोसले, तान्हाजी पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, प्रदीप पाटील, महेश आवळे, बाजीराव पाटील, सागर पाटील , शितल पाटील यांनी परिश्रम घेतले.जनकल्याण फाऊंडेशनच्या कार्यासाठी श्री.शांताराम किरुळकर ९४२३२६६४६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जनकल्याण फाऊंडेशन कमिटीमार्फत करण्यात येत आहे.