ताज्या घडामोडी

रिमझिम कवी संमेलनात सौ रजनी बी पाटील यांनी सादर केलेल्या “ईंदूर-अमळनेर अपघातावर लिखित”पाच मिनिटांच बोनस आयुष्य”चि निवड

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांचे हस्ते श्रीमती रजनी. बी. पाटील यांना केले सन्मानित!!* अंमळनेर येथे रिमझिम कवी संमेलन अगदी आनंदात पार पडले त्यात अनेक मान्यवरांनी कविता सादर केल्या रजनी बी. पाटील यांना कविता सादर करण्या साठी आमंत्रित केलं त्याच कवितेचे शीर्षक आहे फक्त “पाच मिनिटाच बोनस आयुष्य” =अंमळनेर ते इंदूर बस दुर्दैवी घटना घडली ती, गाडी निघण्यापूर्वी जोराचा पाऊस आला. अण आम्ही पाच मिनिट थांबलो, तो पर्यंत गाडी निघुन गेली. अण आमचे प्राण वाचले,बस नर्मदा नदीत कोसळल्याची बातमी काही क्षणात मिळाली, अण बातमी ऐकून डोळ्या समोर अंधार दाटला बोनस आयुष्य मिळालं!! यांच्यावर रजनी ताईनी कविता सादर झाली. रजनी बी. पाटील यांनी सादर केलेल्या कवितेस सौ छाया इसे व अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक कृष्णा पाटील यांनी प्रमाण पत्र देऊन सौ रजनी बी पाटील यांना सन्मानित केले अतिशय भावनिक कविता लिहिली असल्याने सर्व कविता प्रेमीनीं व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवाजीराव पाटील चिटणीस एस एम पाटील व सर्व संचालक मंडळाने तसेच ईगल न्यूज प्रतिनिधी शिवाजी पाटील यांनी राजनीताई यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!