ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन.

नागरिकांनी येथे दारूच्या बाटल्या, पिण्याचे प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकू नये, स्वच्छता पाळावी यासाठी या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक यांनी सांगितले.

Spread the love

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन.

 मुंबई उरण: पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने व स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने 29 मे रोजी सकाळी 7:30 ते 11 या वेळेत उरण तालुक्यातील पूनाडे धरण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल माधव म्हात्रे, पुनाडे येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव , खजिनदार सुरज पवार, सचिव प्रेम म्हात्रे, अभय पाटील, ऩ म्हात्रे, संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, सुविध म्हात्रे, घरत, शुभम ठाकूर, कुमार ठाकूर, समीर पाटील, प्रणय न, आकाश पवार, संपेश पाटील, प्रणित पाटील, हेमंत प्रकाश म्हात्रे, सुमित कोळी, पार्थ कोळी, मित कोळी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी धरण परिसरात आंबट शौकीन तसेच दारुचे पार्टी करणाऱ्यांनी दारूच्या बाटल्या फोडून सर्वत्र टाकून दिले होते. तसेच पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्याही मोठ्या प्रमाणात येथे आढळून आले. सदर दारूच्या बाटल्या, फोडलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, आदी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी 200 हुन जास्त नामांकित ब्रँडेड अशा दारुच्या बाटल्या गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजात तळागाळात जाऊन संस्था काम करते. कोणतेही स्वार्थ न बाळगता सामाजिक बांधिलकी जपत संस्था विविध उपक्रम राबवित असते.

नागरिकांनी येथे दारूच्या बाटल्या, पिण्याचे प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकू नये, स्वच्छता पाळावी यासाठी या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक यांनी सांगितले. पार्टी करणाऱ्यांनी येथे परिसरात कचरा, घाण करु नये अशीही विनंती यावेळी त्यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर ठाकूर यांनी अपघाताची कारणे, अपघातापासून बचाव तसेच स्वरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकंदरीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!