साहित्यिक भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्र ची दुसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कारा करीता निवड.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजीत ११ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात मुंबई कांदिवली पश्चिम मधील साहित्यिक भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्र ची राज्यस्तरीय प्ररेणा पुरस्कार २०२२,करीता निवड करण्यांत आल्याचे निवड पत्राव्दारे कवी सरकार (विलास पाटील) यांनी कळविले आहे.थोड्याच अवधीत साहित्यिक भारत कवितके यांचे आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र अत्यंत लोकप्रिय होऊन साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटत असून या आत्मचरित्रास रविवार दिनांक २४एप्रिल २०२२ एकदिवसीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन हुपरी येथे मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार भारत कवितके यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारत कवितके यांची सहा पुस्तकें प्रकशित झालेली असून सर्वच पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत,येत्या २६ जूनला औरंगाबाद येथे भारत कवितके यांच्या ’ माझ्या गावाच्या दिशेने… ’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शाहू महाराज जयंती निमित्त होत आहे.