ताज्या घडामोडी

स्थलांतरित कुटुंबांचा कायम स्वरुपी प्रश्न मार्गी लावावा: बाबासो कदम

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांचा शासनाने कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा असे प्रतिपादन बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासो कदम यांनी केले.ते करुंगली ता. शिराळा येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांच्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी मिलिंद धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी तालुक्यातील पश्चिम भागातील मिरूखेवाडी, कोकणेवाडी, भास्ष्टेवीडी, येथील कुटुंबांना प्रशासन तात्पुरते स्थलांतरित करित असते परंतु यांचा कायम स्वरुपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. याप्रसंगी स्थलांतरित कुटुंबांना बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे, संपर्कप्रमुख पांडुरंग कारंडे जिल्हा सदस्य संजय गायकवाड जिल्हा सल्लागार पोपट गुरव , सदस्य शामराव चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी: स्थलांतरित कुटुंबांना खाऊ वाटप करताना बाबासो कदम, संभाजी कांबळे, संजय गायकवाड,पोपट गुरव व अण्य (छाया प्रतापराव शिंदे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!