सरुड परिसरात बीएसएनएलचा शिमगा……!
कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)
सरुड परिसराला वारंवार बीएसएनएलचा शिमगा असल्याचे पाहायला मिळत आहे. बांबवडे येथून सरुड फक्त 4 कि. मी. आहे. परंतु वाई वरून सातारा केल्याचा प्रकार सरूड परिसरात आहे. वास्तविक बांबवडे येथून लाईन जोडणे आवश्यक होते. परंतु मलकापूर -अमेणि- शित्तूर वरूण -कापशीमार्गे सरुडला लाईन जोडण्यात आली आहे. यामुळे येथे येणारी लाईन वारंवार तुटत असल्याचे दिसून येत. परंतु बीएसएनएलचे अधिकारी मात्र एकमेकांवर बोट दाखवून हात झटकत असल्याचे दिसत आहे. गेली तीन दिवस झाले सरुड परिसराला रेंज नाही, तर नेट कोठून येणार असाच प्रकार येथे सरु असल्याचे दिसत आहे. अधिकार्यांच्या बेजबादार कारभारामुळे सरुड परिसरातील बीएसएनएलच्या ग्राहकांना इतर कंपन्यांच्या कार्डांना पसंती दिली आहे.मग अधिकारी काय कामाचे? असा प्रश्न ग्राहकांतुन केला जात आहे. बीएसएनएल हे केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. जर अधिकार्यांनां योग्य सेवा देता येत नसेल तर त्यांनी खुर्ची कशाला अडवून ठेवली आहे? असा सवाल करण्यात येत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न काममचाच निकाली काढावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. कोकणातील बीएसएनएलचा असाच भोंगळ कारभार होता. परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडून कोकणातील प्रश्न सोडवला आहे. जर खासदार राऊत जर आपल्या मतदारसंघातील प्रश्न लोकसभेत उपस्थित करुन जर नागरिकांना न्याय देत असतील तर खासदार माने यांना हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडायला सवड नाही का? असा प्रश्न बीएसएनएलच्या ग्राहकांनी केला आहे.