ताज्या घडामोडी
स्वाभिमानीचा मोर्चा विटा नाका चिंचणी रोड येथे पोलीसानी रोखला व कार्याकर्ता व पोलीसाची धुमचक्री
तासगाव : तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा शिवाजी महाराजांना वंदन करून तो मोर्चा विटा नाका येथे आला चिंचणी रोड येथे पोलीसानी तो मोर्चा रोखला
पोलीसांची व स्वाभीमानीच्या कार्याकर्ताची धुमचक्री झाली परत तो मोर्चा विटा नाका येथे थाबला व तेथे रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी खा संजय काका पाटील मोर्चा स्थळी आले व त्यानी सागीतले की येत्या दोन तारखेपर्यंत ऊस बिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो तर शेतकऱ्यांनी ते मान्य केले नाही आता 2500 रूपये नाही 2850 रुपये घेतल्याशिवाय माघार नाही.बेमुदत ठीया आंदोलन तहसीलदार कार्यालय तासगाव येथे सुरू आहे