महाराष्ट्र

कडाक्‍याच्या थंडीने महाराष्ट्र गारठला !

Spread the love

मुंबई  : मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढे चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे. राज्यातील नाशिक ,धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात शीतलहर येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारतातील तीव्र थंडीच्या लाटेचा फटका राज्याला बसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील सर्व शहरांचे किमान तापमान उणे 0.7  अंशावरून 7.2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे. यामुळे सर्वत्र कडाक्याची थंडी असून पुढील तीन-चार दिवस सर्वत्र गारठा राहणार आहे. पारा घसरल्याने थंडीने सर्वसामान्य नागरिकांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील बहुतांश शहरात रात्रीच्या तापमानात घट झाल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!