ताज्या घडामोडी

कांदिवली मध्ये भाजपा आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्त्वाखाली ” तिरंगा यात्रा ” संपन्न

Spread the love

भारत कवितके मुंबई
मुंबई मधील कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभाचे विद्यमान आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवार दिनांक १४ आगस्ट २०२२रोजी सकाळी ९ वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत भर पावसात मालाड नटराज मार्केट ते एस.व्ही.रोड वरुन बोरीवली स्वामी विवेकानंद पुतळ्यास पर्यंत ” तिरंगा यात्रा ” चे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात ” वंदे मातरम”,” भारत माताकी जय ” अशा घोषणांनी. सारा परिसर दणदणाणून,सोडला.या ” तिरंगा यात्रा ” मध्ये शालेय व महाविद्यालय मधील विद्यार्थी विद्यार्थ्यीनी ची संख्या साधारण ३००० व भाजपा पदाधिकारी, नागरिक यांची साधारण संख्या ४५०० एवढी होती.यावेळी आमदार योगेश सागर यांनी सांगितले की, ” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भारत देशात ३०करोड घरावर व महाराष्ट्रातील ३ करोड घरावर तिरंगा फडकाविला जाईल.सव्वाकिलो मिटर लांबीचा तिरंगा विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक व भाजपा पदाधिकारी यानी भर पावसात घोषणा देत बोरीवली ला स्वामी विवेकानंद पुतळ्यापर्यंत नेला.सर्व जण देशभक्तीची गाणी गात होते,विविध घोषाणा देत होते.या प्रसंगी उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार सुनिल राणे,आमदार मनिषा चौधरी,मालाड,कांदिवली, व बोरीवली या विभागातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!