ताज्या घडामोडी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील कामेरी, दिघंची, नांद्रे आणि आरग अशा चार ग्रामपंचायतीने मारली बाजी

Spread the love

इस्लामपूर प्रतिनिधी -प्रथमेश क्षीरसागर
इस्लामपूर दि.४ माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील कामेरी, दिघंची, नांद्रे आणि आरग अशा चार ग्रामपंचायतीने बाजी मारली असून या ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा ५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे शुभ हस्ते पारीतोषिक देऊन मुंबई येथे गौरव होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे नेतृत्वाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे अभियानाचे जिल्हा समन्वयक श्रीधर कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली व माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन,२१-२२या वर्षांत सांगली जिल्ह्य़ातील ६९९पैकी ६९३ग्रामपंचायतीनी भाग घेतला होता फिल्ड असेसमेंट तपासणी साठी ६४ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगली जिल्हय़ाचे चार ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे ,यांना बक्षिस व पुरस्कार देऊन मुंबई येथे मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.ज्या ग्रामपंचायती पुरस्कारापासुन दुर राहील्या असतील त्यांना नव्याने पुन्हा संधी मिळणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!