आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

भुयारी गटाराचे कामामुळे लोकांची गैरसोय..

वलवण नांगरगाव मार्गे व वळकाईवाडी मार्गे जावे लागते, त्यामुळे या ठिकाणी तातडीने काम पूर्ण करावे.. .

Spread the love

भुयारी गटाराचे कामामुळे लोकांची गैरसोय; वलवण नांगरगाव मार्गे व वळकाईवाडी मार्गे जावे लागते.

 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ जानेवारी.

भुयारी गटाराचे कामामुळे लोकांची गैरसोय; वलवण नांगरगाव मार्गे व वळकाईवाडी मार्गे जावे लागते त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येथील भांगरवाडी भागात गेली महिनाभर काम चालू आहे , येथील रस्ता बंद केल्याने दोनचाकी वाहनचालकांना पंडीत नेहरू विद्यालयाचे छोट्या प्रवेशद्वारातून वळसा घालून जावे यावे लागत होते. भांगरवाडी येथे ढमढेरे यांचे घरासमोर गटाराचे काम सुरू आसताना डाॕ .बी.एन पुरंदरे विद्यालयाचे विद्यार्थांना येथून जा ये करायलाही येथे जेसीबी आडवा लावून ठेकेदार यांचेवतीने वाहतूक बंद केल्याने ञास होत होता.

वाहनचालक यांना भोंडे हायस्कूल मार्गे रस्ताही खाजगी बिल्डरने बंद केल्याने वळकाईवाडी मार्गे बाजारात जा ये करावी लागते , या ठिकाणी श्रदा हाॕस्पिटलचे बाजूने जायला मार्ग नसल्यामुळे पुलावरून आयसीआयसी बँकेच्या समोरूनच रस्ता बंद केल्याने वाहनचालकांना कसरत करीतच नांगरगाव वलवणमार्गे गवळीवाडा येथे जावे यावे लागत आहे.

सुरैयापूलही काम चालु आसल्याने बंद आहे , त्यामुळे अत्यंत वळसा घालूनच वाहनचालकांना जावे यावे लागत आहे , त्यामुळे या ठिकाणी तातडीने काम पूर्ण करावे व वाहनचालक , शालेय विद्यार्थी यांची गैरसोय दूर करावी , अशी मागणी वाहनचालक , शालेय विद्यार्थी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!