कांदिवली पश्चिम मध्ये महाशिवरात्रि निमित्त महिलांची जल कलश यात्रा संपन्न.
भारत कवितके मुंबई
कांदिवली पश्चिम मधील के.डी.कंपाऊंड, जनकल्याण सेवा सोसायटी येथील दुर्गामाता मंदिर ते चारकोप गावातील डिंगेश्वर तलाव पर्यन्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी विभागातील महिला व पुरुष भाविकांनी महाशिवरात्रि निमित्त महिलाची जल कलश यात्रा काढली .नववस्त्र परिधान करून व डोक्यावर नव कलश घेऊन साधारण २५० ते ३०० महिलांनी या कलश यात्रेत सहभाग घेतला,तर १००ते १५० पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. दुपारच्या रणरणत्या उन्हात पालखी,रथा सोबत पायात कोणतेही वाहण नसताना,अगदी अनवाणी पायी चालत महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. अंबे माते की जय,हर हर महादेव,या घोषणानी सारा परिसर दणाणून गेला होता. या मध्ये महेश दुबे,सोमनाथ अग्रवाल, मुकेश वर्मा,नगरसेवक कमलेश यादव, नगरसेवक बाळा तावडे,, संजय सिंह, योगेश पडवळ,, पत्रकार, कवी,लेखक,सामाजिक कार्यकर्ते, भारत कवितके, दिनेश सिंह, रामनाथ वर्मा,सोनु पाटील,राजेश गुप्ता, सिताराम विश्वकर्मा,सुरेश वर्मा,अझरभाई सिद्दीकी, मुकेश चौधरी, आर.एस्.वर्मा, प्रेम शंकर तिवारी, व महिला भाविक उपस्थित होते.