प्रतिक देसाई आणि मित्र मंडळातर्फे जाकादेवीत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे उत्स्फुर्त स्वागत
जाकादेवी/वार्ताहर:-
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे जाकादेवी येथे युवा नेते प्रतिक देसाई व मित्र मंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन उद्योगमंत्र्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
उद्योग मंत्री उदय सामंत हे खंडाळा जयगड दौऱ्यावर जात असताना ते जाकादेवी बाजारपेठेतील प्रख्यात निवारा हॉटेल येथे थांबले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक देसाई , बंटी सुर्वे आणि मित्रमंडळ यांनी भेट घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांना बुके देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या दरम्यने उदय सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना.जाकादेवी येथे प्रसिद्ध असलेल्या प्रसन्न खेडेकर यांच्या निवारा हॉटेलमध्ये मिसळ खाण्याचा आनंद घेतला. मिसळ अतिशय चविष्ट आणि सुंदर असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्र्यांनी देऊन हाँटेलचे मालक प्रसन्न खेडेकर,गौरव खेडेकर यांच्याकडे समाधान व्यक्त केले. खेडेकर बंधूंनी मंत्र्यांना धन्यवाद दिले. सरपंच प्रकाश खोल्ये , प्रतिक देसाई, रोहित मयेकर यांच्याकडे संवाद साधून जाकादेवीतून ते खंडाळा जयगडकडे रवाना झाले.यावेळी युवा कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे, राकेश खेऊर.सुजल देसाई,ओम मोकाशी, सरपंच प्रकाश खोल्ये , प्रसन्न खेडेकर, गौरव खेडेकर, दादा सावंत इ.उपस्थित होते.