राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सांगली जिल्ह्यात – अविनाश पाटील
सांगली :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २८ जानेवारी २०२१ पासुन गडचिरोली जिल्ह्य़ातुन सुरु झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सांगली जिल्ह्यात येणार आहे. सदर यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष घेणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील व शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातील तालुक्यात जाऊन सर्व सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर यात्रेचे सोमवार दि. १८ एप्रिल रोजी विटा येथे आगमन होणार आहे. दि. १८ रोजी दुपारी २ वा. खानापूर – आटपाडी , दु. ४वा.पलुस-कडेगाव , सायं.६ वा तासगाव-कवठेमहांकाळ अनुक्रमे या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील . दि. १९ रोजी स. ९ वा. जत,दु. १ वा. मिरज, दु. ३वा.सांगली,सायं. ५ वा. इस्लामपूर अनुक्रमे या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. दि. २० रोजी स. ९ वा. शिराळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
तरी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील करणेत आले आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा महिला अध्यक्ष सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, युवती जिल्हाध्यक्ष पुजा लाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, आदी उपस्थित होते.