हरवत चाललेल्या लोककलांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाने जय किसान व्याख्यानमालेची सांगता
इस्लामपूर दि 6(प्रतिनिधी)
हरवत चाललेल्या लोककला जपल्या पाहीजेत त्याच पुनरुज्जीवन ही आजच्या काळाची गरज आहे असे मत प्रा दुष्यंत पाटील यांनी व्यक्त केले
ते येडेनिपाणी ता वाळवा येथील जय किसान मंडळ आयोजित स्व.पद्मभुषण डॉ.वसंतदादा पाटील यांच्या ३४ व्या स्मृती व्याख्यानमालेचे पाचवे व्याख्यान सत्र ” भुपाळी ते भैरवी ” या लोककलांच्या कार्यक्रमाने संपन्न झाले. यावेळी अक्षस्थानी प्रा दुष्यंत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले वसंतदादा च्या स्मृती ना उजाळा देत हा विचारांचारथ ३४ वर्षे चालवणे ही मोठी गोष्ट आहे आणि हे फक्त येडेनिपाणीच जय किसान मंडळ करु शकते यावेळी त्यांनी ही व्याख्यानमाला १०० वर्षे अशीच अविरत चालो अशी अपेक्षा व्यक्त केली . समाजप्रबोधनाचा वसा घेत आजच्या जगात अश्या अनेक लोककला आहेत त्या हरवत चालल्या आहेत, येणार्या पुढच्या पींढ्यांच्या पर्यंत या लोककला पोहचायला पाहीजेत, त्या जपल्या पाहीजेत म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती केली गेली असे कार्यक्रमाचे निर्माते संदीप कदम यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अंकुर बालमंदीर तुंग चे अध्यक्ष कृष्णात पाटोळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. दिनकर पाटील दादा, शंकरराव चव्हाण, मंडळाचे संस्थापक पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, डॉ.दिपक स्वामी, शंकर पाटील प्रा. स्वप्नील पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा जयश्री पाटील यांनी केले. आभार संयोजक शंकर पाटील यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रा.स्वप्निल पाटील यांनी केले.