ताज्या घडामोडी

डाॅ अभिमन्यू टकले यांचा जमातीच्या वतीने नागपूर येथे सत्कार

Spread the love

स्वर्गीय मा.आमदार गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला २३|२४जुलै२०२२ प्रचंड यशस्वी झाले.याची दखल महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक जनतेने व काही प्रिंट मिडीयाने,सोसेल मिडीयानेही घेतली गेली आहे.भरगच्च प्रतीसादात,प्रचंड अशा उत्साही वातावरणात, हे संमेलन पार पडले.हा कार्यक्रम राज्यातील सर्व क्षेत्रातील जमातीने अगदी स्वत च्या खांद्यावर घेतला आहे.सर्व राज्यातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. अनेक लेखक या ऐतिहासिक कार्याचे लीखान करू ईछीत आहेत.खरोखरच हे विचार पीठ लोकांचे झाले आहे. सर्वानाच आपले वाटू लागले आहे.या प्रेमाच्या भावनेतूनच आज डाॅ अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व धनगर धर्म पीठ यांचा नागपूर येथील गणगोता कडून सत्कार करण्यात आला. श्री शिवकुमार आवझे व सौ कांचन आवझे यांनी हे आयोजन केले पहिला सत्कार ही केला. श्री धनराज खडसे सर कवी, सौ विद्या खडसे यांनीही सत्कार केला .श्री दुर्गेश महाजन व डाॅ सौ रक्षा महाजन लेखीका.यांनीही सत्कार केला. श्री खुशाल तांबडे,श्री उत्तम सुरनर यांनीही सत्कार केला. सर्वानी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा. दिल्या. जमातीने एकत्र येऊन आरक्षण घेतले पाहिजे व सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत ही भूमीका मांडली. श्री धनराज खडसे सर यांनी डाॅ अभिमन्यु टकले यांच्यावर एक स्वरचित काव्य सादर केले.*मा. डॉ. अभिमन्यु टकले सर…*
*यांना समर्पित…*
————————————-
असतात काही माणसं ध्येय-वेडी,
आजपावेतो होते केवळ ऐकिवात…

आता घेतलाय अनुभव प्रत्यक्षात,
टकले सर साक्षात तुमच्या रुपात…

जीवनाच्या त्या प्रत्येक वळणावर,
माणूस माणसाशी जोडत गेलात…

जोडलीत माणसं जिंकलीत मनं,
नैराश्यात जागृत केलं आत्मभान…

निद्रावस्थेतील सुस्त समाजात,
जागवलात आशेचा नवं-किरण…

अहःर्निश मनी तो एकचि ध्यास,
कार्यसिद्धीचा उत्स्फूःर्त उल्हास…

अभिमन्यु म्हणावं की एकलव्य,
स्वप्न मनी बाळगलं भव्य-दिव्य…

अज्ञानावर सोकावला होता काळ,
शालीनतेनं सांधली भंगलेली नाळ…

सारस्वतांचा नित्य भरवूनी मेळा,
निर्मिलात अमृतमंथनी गोतावळा…

संमेलनी होऊ लागले चिंतन-मनन,
तृष्णातूरां मुखी जणूच ते अमृत-पान…
————————————-
*शब्दांकनः धनराज खडसे, नागपूर.*
डाॅ अभिमन्यु टकले सत्काराला उत्तर देताना म्हणाले गणगोताने केलेला सत्काराचा आनंद हा वेगळाच आसतो. आपण एकत्र येत आहोत. आपण एकत्र आलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवू शकतो.
सौ विद्या खडशे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!