शिराळा,वाळवा तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानी बाबत तहसीलदारांना निवेदन.
शिराळा प्रतिनिधी – शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतीचे वन्य प्राण्यांचा कडून होणारे नुकसान यावर बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई वाढवून मिळावी. याकरता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांचे हस्ते शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन यांनी देण्यात आले.यावेळी माजी उपसभापती बी. के. नायकवडी, विश्वास कदम, बंडा डांगे, यशवंत निकम, गजानन पाटील, सचिन यादव, सुनील कवठेकर, विजय पाटील, विजय महाडिक, एन डी लोहार, प्रकाश जाधव, वसंत पाटील, एस. के. पाटील, अरविंद बुद्रुक, माणिक पाटील, अमित कुंभार,शरद गुरव, रघुनाथ पाटील, विनोद कदम, सुशील गायकवाड, पांडुरंग गायकवाड, उद्धव पाटील, संजय हिरवडेकर, शंकर पाटील, गजानन सोनटक्के, वैभव कांबळे, दिलीप पाटील, आनंदराव पाटील, प्रमोद पाटील, विजय थोरबोले, बाजीराव सपकाळ, संभाजी पाटील,शिवाजी खोत, राजू साळूखे यांच्यासह शिराळा वाळवा तालुक्यातील विविध गावातील सरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.