ताज्या घडामोडी

पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे: रेखा जाधव

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
पालक , आणि पाल्य यांचेमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे.सध्यस्थिथीला हा सुसंवाद नसल्याने अनेक दुर्दैवी घटनां सातत्याने घडत आहेत असे मत पोलिस उपनिरिक्षक रेखा जाधव यांनी व्यक्त केले.
त्या तुरुकवाडी ता शाहूवाडी येथील दत्तसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दत्तसेवा विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या स्नेसंमेलन , बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या . यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी दत्तसेवा समुहाचे अध्यक्ष आनंदराव माईंगडे होते . यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाल्या की, पालकांनी मुलांचे मित्र ,आईने मुलगीची मैत्रीन बनुन सुसंवाद साधला पाहिजे. यामधून त्यांच्या समस्या आणि विचारांची देवाण घेवाण होईल.या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲड.सतिश माईंगडे,
सरपंच गणपती कांबळे, प्रशासकीय अधिकारी जे.एस . पोतदार , बी.एस. शेळके, संचालिका अर्चनाताई माईंगडे, सचिव डाॅ . बाळासाहेब पाटील, सुर्यकांत पाटील ,आनंदराव पाटील , पतपेढीचे लक्ष्मण पाटील , मुख्याध्यापक गणेश पाटील
आदींसह दत्तसेवा विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ , विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका लता हारुगडे यांनी तर आभार माध्यमिकचे मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!