विद्यार्थ्यांना आनंददायी व उपक्रामशिल शिक्षणाची गरज : केंद्रप्रमुख उत्तम कदम
कोकरुड/ वार्ताहर
विद्यार्थ्यांना आता आनंददायी व उपक्रामशिल शिक्षणाची गरज ओळखून शिक्षण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. असे प्रतिपादन केंद्रप्रमुख उत्तम कदम यांनी केले.
केंद्र नाटोली अंतर्गत, जि. प. शाळा सागांव येथे आनंददायी शिक्षण व उपक्रम कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील असतो.याचाच एक आदर्शवत व नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आनंददायी शिक्षण आहे.
आता 1ली ते 8 पर्यंतच्या वर्गाना पहिला तास हा आनंददायी शिक्षणा चा होणार आहे. यामध्ये सोमवार -सजकता,मंगलवार, बुधवार -कथा,गुरुवार, शुक्रवार -कृति,शनिवार -अभिव्यक्ति /छंद असा पहिला तास बंधनकारक असणार आहे.यावेळी पहिली ते चौथी सहावी ते आठवी अशा दोन सत्रात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शिक्षिका स्वाती देसाई, रमेश तिके, दादासो खोत, सुभद्रा माने, संभाजी खोत , रुपाली पाटील मिनाक्षी पाटील , प्रतिभा जाधव यांनी आनंददायी शिक्षणाची संकल्पना समजावून दिली.
यावेळी अरविंद सदावरते अंजनी साळुंखे, विशेष विषय शिक्षिका बिंदिया निकम, एस. एम. पाटील बाबासाहेब पाटील, टि.एस.पाटील आदींसह नाटोली केंद्रीस्तरातील सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमांचे प्रस्ताविक श्रीरंग गायकवाड़ यांनी तर आभार जयसिंग पाटील यांनी मानले.