महाराष्ट्र

मविआचे सरकार असते ;तर वेदांन्ता फाॕक्सकाॕन प्रकल्प नक्कीच महाराष्ट्रात , मावळात आणला आसता : शिवसेनानेते , आमदार आदित्य ठाकरे .

खोके सरकारने हा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प हातोहात घालवला.

Spread the love

मविआचे सरकार असते ;तृर वेदांन्ता फाॕक्सकाॕन प्रकल्प नक्कीच महाराष्ट्रात , मावळात आणला आसता : शिवसेनानेते , आमदार आदित्य ठाकरे .

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर वडगाव मावळ:२४(प्रतिनिधी )

मविआचे सरकार असते ;तृर वेदांन्ता फाॕक्सकाॕन प्रकल्प नक्कीच महाराष्ट्रात , मावळात आणला आसता , आणि आज हा जलौश मोर्चा काढला असता. या खोके सरकारने हा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प हातोहात घालवला.या मोर्चामधे येताना येथील आमदार सुनिलआण्णा शेळके , आणि कार्यकर्ते भेटले ,या मोर्चाचे मधे उतरल्याबरोबर एक रोष व एक रागआपल्या मनात आहे , शिवसेनानेते , आमदार आदित्यजी ठाकरे यांचेकडून शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

वडगावात सायंकाळी पाचचे दरम्यान शिवसेना नेते , आमदार आदित्यजी ठाकरे यांचेतर्फे वेदांन्ता फाॕक्सकाॕन गुजरातला गेल्याचे निशेधार्थ वडगावला पोटोबा महाराज मंदिर ते तहसिलदार कार्यालय अशी जल्लौशयाञा काढली. यावेळी पूणे जिल्हासंपर्क प्रमुख सचिन आहेर, रायगड चे जिल्हाप्रमुख बबन पाटील , पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , तसेच उप तालुका संघटक सुरेश गायकवाड , उपतालुकाप्रमुख आशिश ठोबरे , आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी लोणावळ्यातून शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , महिला जिल्हा संघटिका व माजी नगरसेविका शादान चौधरी , रामभाऊ थरकुडे , अशोक बोंद्रे , युवासेना जिल्हा संघटक अनिकेत घुले , तसेच ज्ञानेश्वर जांभूळकर , महेश खराडे , वडगावचे , तळेगाव चे असे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री.ठाकरे यांनी ग्रामदैवत श्री पोटोबामहाराज , जोगेश्वरी मंदिरात दर्शन घेतले व जनआक्रोश याञेला प्रारंभ केला.
भाषणात श्री.ठाकरे म्हणाले, ते ड्रोन बाजूला करा ते खोके सरकारसारखेच हवैत आहेत.त्यांचे काम कमी व आवाज जास्त आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे.
आमित आगरवाल या वेदांन्ता फाॕक्सकाॕन चेवतीने ट्विट केले की आम्ही गुजरात ला जात आहोत.त्यांचेकडून तेथील उद्योगमंञी व मुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले आहे.
हा प्रकल्प आपल्या देशातून गेला नाही.गुजरातला गेला म्हणून दु:ख आहे.
या प्रोजेक्टकरीता आपण दहा हजार कोटी सबसिडी देत होतो.वीज , पाणी , रस्तै देत होतो , तरीही हा प्रकल्प येथील राज्य व केँद्र सरकारच्या आकार्यक्षमपणामुळे गेला आहे.याची खंत वाटते.चीड आल्याशिवाय रहात नाही.
महाराष्ट्र हे देशासाठी आर्थिक राजधानीचे मुख्य राज्य आहे.येथे इंडस्ट्री आणली , आय आर बी आणली, इन्शूरन्स कंपनी आणली.राज्यात आणली आहे. आपण ९९ वर्षासाठी करार केले आहेत.हे चुकीचे सरकार , खोके सरकार लवकरच कोसळणार आहे, केँद्राने सरकार बदलले , सत्तांतर होताच गुजरातने प्रकल्प पळवला.

राज्यात खरा मुख्यमंत्री कोण हेच जनतेला माहीत नाही , असा टोलाही श्री.ठाकरे यांचेतर्फे लगावण्यात आला.
या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे.सत्तामेव जयतेला महत्व नाही.
अडीच हजार कोटीची सवलतही देवून ही मुंबईत होणारा ड्रग्ज बल्क पार्क चा प्रकल्पाचे गुजरात , आंद्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेशला गेलेला आहे. त्यामुळे सुमारे सत्तर ऐशी हजार तरूणांचा रोजगार हिरावला गेला आहे ,असे श्री.ठाकरे म्हणाले.
हा वेदांन्ता फाॕक्सकाॕन सेमी कँडक्टर प्रकल्प आपल्या तळेगाव , मुंबई , पुणे , संभाजीनगर , लोणावळा , ठाणेत का नाही राहिला.तो कसा गुजरातला गेला.याठिकाणी दोन लाख तरूणांचा रोजगार बुडाला. तो नाकर्ते खोके सरकारमुळे ! ! या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करावा तितका कमी आहे ! ! असे.ठाकरे म्हणाले..
….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!