प्रत्येक स्त्री जो पर्यंत स्वावलंबी व सक्षम होत नाही तो पर्यंत त्यांच्यावरील अन्याय कमी होणार नाही ; सौ.छाया माळी
मसुचीवाडी येथे माता पालक मेळावाने
स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाची सांगता
इस्लामपूर दि 18 (वार्ताहर ) समाजात आज सून व मुलगी यांना वेगळी वागणूक दिली जाते त्यामुळे प्रत्येक स्त्री जो पर्यंत स्वावलंबी व सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरील अन्याय कमी होणार नाही असे प्रतिपादन वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.छाया माळी यांनी केले .
त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसुचीवाडी येथे ” आजची सावित्री ” या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी त्यांनी विवेकानंद जयंती घेतलेल्या ग्रंथप्रदर्शन ,पाक कला व रांगोळी या स्पर्धांचे उद्घाटन केले.
स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहात क्रीडा स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, टॅलेंट सर्च स्पर्धा व बाल बाजार भरविण्यात आला होता
या कार्यक्रमास सौ.योगिता सुहान कदम ,सौ.महानंदा कदम,ग्रा.पं.सदस्य उज्वला फाटक,सौ.निलम फाटक, सुषमा कदम,सौ.लतिका कदम व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. होत्या.सौ.एस.ए.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.या सप्ताहाचे संयोजन सौ.एम.बी.फाटक,यु.बी.जाधव ,बी.आर.संकपाळ, श्रीमती. एस.व्ही. रोकडे, सौ.एस.आर.कदम, कु.अंकिता देशमुख सौ एस.ए.कदम,रमेश पाटोळे,योगेश कदम यांनी केले.मसुचिवाडी ता वाळवा येथे माता पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना सौ.छाया माळी, योगिता कदम, उज्वला फाटक, मुख्याध्यापिका सौ.एस.ए.पाटील उपस्थित होत्या .