नावलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज….
कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)
नावली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे. यासाठी शाहुवाडी- पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे -सावकार यांनी आमदार फंडातून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. जागृत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिराची अवस्था वाईट झाली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार होने गरजेचे आहे. मंदिराची इमारत पूर्णपणे जुन्या बांधकामाचे आहे. छतावर लाकडी साहित्य असून छप्पर कौलारू आहे. यामुळे पावसाळ्यात गळती लागत असल्याचे दिसून येत आहे. आमदार फंडातून निधी दिला तर मंदिराचा जिर्णोद्धार करणे शक्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. आमदार विनय कोरे यांनी विकास कामाला चालना दिली आहे. यामुळे हा प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पावसाळ्यात मंदिरात गळती लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार निधी मिळाला तर लोकवर्गणीतून नावलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास पुढाकार घेऊ, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. खासदार धैर्यशील माने यांनीसुद्धा खासदार फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमदार फंड आणि खासदार फंड उपलब्ध झाल्यास नावलीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर सुसज्ज उभा राहील, आशा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची ही मागणी कधी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे.