सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान
सांगली…
जिल्हाभर शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे
खराडे म्हणाले शनिवारी सांगली जिल्ह्यात मांजरडे, हातनुर, जाखापुर, कुची सह अन्य काही भागात गारपीट झाली आहे.
या गारपिटीमुळे छाटणी केले ल्या द्राक्ष बागांचे काड्याचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी काड्या फुटल्या आहेत या फुटलेल्या काड्याना फळधारणा होत नाही फळधारणा न झाल्यामुळे द्राक्ष लागतच नाहीत त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान होते त्यामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागा वर गारपीट झालेल्या परिसरात पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी त्यासाठी कृषी विभागाला आणि तलाठ्यांना तातडीने पंचणाम्याचे आदेश द्यावेत
याशिवाय पलूस येळावी परिसरातील अनेक शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत अद्याप द्राक्षे आहेत अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे अशा द्राक्ष बागाचेही पंचनामे आवश्यक आहे सदर नुकसान द्राक्ष पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सध्याच्या पीक विमा योजनेचा कालावधी मार्च पर्यंत असतो आणि जरी विमा योजनेच्या आठ महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष बागेचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही कारण पीक विमा योजनेचे निकष कंपनी हिताचे आहेत शेतकरी हिताचे नाहीत त्यामुळे पीक विमा योजना सक्षम करण्याची गरज आहे