ताज्या घडामोडी

मनोज आव्हाड यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

Spread the love

मानवहित लोकशाही पक्ष व सकल मातंग समाज यांच्या वतीने देण्यात आले निवेदन

औरंगाबाद शहरातील तरुण मनोज आव्हाड यांची काही समाजकंटकांनी २० एप्रिल रोजी लाकडी दांड्याने ठेचून निर्घुणपणे हत्या केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सदरील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,पीडित कुटुंबाला आरोपींच्या नातेवाइकाकडून जीविताला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण द्यावे तसेच पिडीत कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आले.
यावेळी राज्यमंञी अब्दुल सत्तार म्हणाले की सदरील घटनेतील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी करण्यात येईल तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य तो न्याय देण्यात येईल.
यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे ,सिल्लोड तालुका संपर्कप्रमुख सखाराम आहिरे, तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड ,तालुका उपाध्यक्ष बाबुराव आहीरे ,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय कांबळे, युवा तालुका कार्याध्यक्ष दादाराव शिरसाट ,युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे , तालुका सल्लागार शिवदास दनक, सचिव शिवराम कांबळे, युवा उपाध्यक्ष सुखदेव कांबळे, शहराध्यक्ष मनोज अहिरे, उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे, सचिव रविंद्र महाले, कार्याध्यक्ष,पृथ्वीराज सोनवणे यांच्यासह पक्षाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!