महाविकास आघाडी सरकार शाळा बंद ठेवून शिक्षणव्यवस्था उध्वस्त करत आहे: सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी:
फिरोज तडवी
कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय म्हणून महाविकास आघाडी सरकार 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवून शिक्षणव्यवस्था उध्वस्त करत आहे असा.जाहीर आरोप भीम आर्मी संविधान रक्षक दलचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी केला आहे. ते प्रतिनिधींशी बोलत होते.पुढे बोलताना म्हणाले की माॅल, हाॅटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृह,लग्न समारंभ, अंत्यविधी,.सर्व ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.तसेच गावोगावचे आठवडी बाजार ,सलुन दुकाने ,ब्युटी पार्लर,यांनाही परवानगी दिली आहे.मग शाळाच 50 टक्के उपस्थितात का सुरू ठेवण्यात परवानगी दिली नाही. ग्रामीण भागात सर्व सामान्य,शेतकरी, शेतमजूर,अंत्यत गरीब कुटुंबातील नागरींचीच मुलं सरकारी शाळेत शिकत आहेत. गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद होत्या त्यामुळे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता कशी सुधारणार, 2 वर्षात किती विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे का?
शाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही.ग्रामीण भागातील मुलांच्या पालकांना मोबाईल घेण शक्य नाहीय.जसे मुलभूत सुविधात आरोग्य आहे तसेच शिक्षण देखील आहे त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील सर्व शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात असे संदानशिव म्हणाले.