सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सौ श्वेतलताई पाटील यांनी आपल्या शेतावर नाविन्यपूर्ण भूमिगत जल बंधाऱ्याचा प्रयोग केला त्याची पाहणी
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सौ श्वेतलताई पाटील यांनी आपल्या शेतावर नाविन्यपूर्ण भूमिगत जल बंधाऱ्याचा प्रयोग केला त्याची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉअशोक राव ढगे यांनी केले.
सौ पाटील ताई यांनी त्यांच्या शेतावर बाजूला असलेल्या ओढ्यावर भूमिगत विहीर खोदली त्यानंतर विहिरीच्या बाजूने ओढ्या चे जे पाणी वाहून जात होते तेथे सिमेंट काँक्रीटची भिंत बांधून पाण्याचा प्रवाह बंद केला भूमिगत बंधाऱ्यात इतके पाणी साठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ते जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत वर आले चालू वर्षी पाऊस मान चांगले झाल्यामुळे पाण्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात झाली आजही मे महिन्यात भरपूर पाण्याचा साठा आहे भूमिगत बंधाऱ्यातून पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून त्याला अस्तरीकरण करण्यात आले सौ स्वेतल ताई म्हणाल्या की पाणीही राष्ट्राची संपत्ती आहे तिचा वापर फार काटकसरीने केला पाहिजे त्याच बरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग शेतावर करणे काळाची गरज आहे कारण शेतीसाठी पाणी कमी होत आहेकृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे म्हणाले की पाण्याच्या बचतीसाठी हा प्रयोग नाविन्यपूर्ण तसाच कौतुकास्पद आहे