ताज्या घडामोडी
बहिरेवाडी मुख्य रस्त्यावरील खड्डे भरले
वारणानगर ते बहिरेवाडी रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून खड्डे पडले होते.पावसाळ्यामधे रस्त्यावर पाणी साठल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.
वाहनधारकांना या खड्ड्यांमधून गाडी चालवताना त्रास होत होता.हे खड्डे भरुन घेण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केली होती.याची दखल घेऊन संबंधित विभागाने हे खड्डे डांबरीकरण करुन भरुन घेतले.त्यामुळे वाहनधारकांमधे आंनंदाचं वातावरण निर्माण झालंय.
प्रतिक्रिया –
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना मणक्याचा त्रास सुरु होण्याचा धोका असल्याने असे खड्डे वेळोवेळी भरुन घेणं गरजेचं असतं.
डॉ.अभिजीत जाधव
अध्यक्ष
रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.