ताज्या घडामोडी
वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे ऊसाची मोठ्या प्रमाणात नुकसान
सोलापूर:- जिल्ह्यात काल रात्री विजेचा कडकडाट वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. दक्षिण सोलापूर मधील शिरवळ भागात दोन तास वादळी वारा व पावसामुळे शिरवळ शिवारातील ऊसाची भरपुर प्रमाणात नुकसान झाले आहे, तर मोहोळ तालुक्यात
पावसा अभावी दुष्काळच्या वाटेकडे जात असल्याने तेथील शेतकरी दुःखी आहेत. याआधी अक्कलकोट तालुक्यात ही ऊस, केळीचे बाग सुध्दा वार्याने पडुन नुकसान झाले आहे तरी पिकाची नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजुर करावी अशी मागणी शेतकर्यातुन होत आहे.