ताज्या घडामोडी
युनायटेड माजी सैनिक वेलफेअर असोशिएशनच्या वतीने कारगिल युध्दातील शहीदांना श्रध्दांजली
(गुरुनाथ तिरपणकर)-पाकिस्तानच्या ताब्यातुन कारगिलचा भाग सोडविण्यासाठी तब्बल ६०दिवस चाललेल्या युध्दामध्ये भारतीय वीरपुत्रांनी जीवाची बाजी लावली.त्यामुळेचे २६जुलै१९९९रोजी पाकिस्तानचा पराभव झाला होता.सुमारे २३वर्षापूर्वी कारगिल युध्दाचा थरार आजही गौरवाने सांगितला जातो.हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने बदलापुर पुर्व येथील महालक्ष्मी तलाव गार्डन येथील शहिद स्तंभाजवळ युनायटेड माजी सैनिक वेलफेअर असोशिएशनच्या वतीने कारगिल युध्दातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मा.नगरसेवक संभाजी शिंदे,युनायटेड माजी सैनिक वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष आबा बांदेकर,सचिव सुरेशचंद्र व इतर वीर नारी,माजी सैनिक उपस्थित होते.