ताज्या घडामोडी

आरक्षणामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला : बाबासाहेब कदम

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे.असे प्रतिपादन बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी केले.ते
कोकरुड ता शिराळा येथे निनाई मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधाचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.जिल्हा सल्लागार वैभव वाघमारे, जिल्हा सदस्य संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील कायदेशीर तरतुदीमुळे समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळत आहे.यावेळी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे शिराळा तालुका कार्याध्यक्ष विकास सुतार, कोकरुड अध्यक्ष प्रकाश सुतार, शिराळा पदाधिकारी संतोष सोनवले , नारायण सनगर, महादेव सुतार ,चंद्रकांत पोतदार, संजय पोतदार, अमर माळी, प्रवीण यादव, सुनील वाघमारे, गणेश सुतार, विनायक कोळवणकर, राजेंद्र कासार ,भरत मोहिते, विलास कुंभार , बाबासो कुंभार, संतोष कासार, वसंत कुंभार आदींसह कार्यकर्ते उपस्थित मोठ्या होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!