भावसार क्षत्रिय समाजाचे आद्य संघटक श्री.महादेवरावजी तेलकर यांची 168वी जयंती नांदेड येथे उत्साहात साजरी.
प्रतिनिधी- डॉ.सुनील ना.भावसार
भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेडच्या वतीने आद्य संघटक, थोर समाज सेवक श्री महादेवरावजी तेलकर यांची168 वी जयंती दिनांक 27/09/2022 मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री रामदास शामराव पेंडकर तानुरकर संस्थापक अध्यक्ष भावसार सेना नांदेड हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री उदय तेलकर, (वास्तुशास्त्र व ज्योतिष शास्त्र प्राविण्य)पुणे,
श्री विनोद सूत्रावे(अध्यक्ष, भावसार समाज सिडको नविन नांदेड) श्री संजय पेटकर, (अध्यक्ष, युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नवीन नांदेड )
सौ.अन्नपूर्णा मेहेत्रे,सचिव, (भावसार प्रगती महिला मंडळ नांदेड) हे होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री हिंगलाज माता व श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .त्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे यांना पुष्पहार,शाल, झेंडा,टोपी, सन्मान चिन्ह, भावसार गौरव गाथा हा ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर श्री प्रदीप सोनवणे जिल्हा अध्यक्ष भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड यांनी प्रस्ताविक भाषण केले.
भावसार सेनेचे सचिव अभिषेक ताकझुरे यांनी भावसार सेना संघटनेने राबवलेल्या समाज हिताच्या अनेक कार्यक्रमाची आठवण करून दिली .तसेच गणेश मूर्ती उत्कृष्ट सजावट, महालक्ष्मी मूर्ती उत्कृष्ट सजावट, भाषण स्पर्धा, इत्यादी स्पर्धेत प्रथम आलेल्या विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिले .सर्व स्पर्धकांचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, झेंडा , भावसार गाथा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या कार्याची आठवण करून दिले.
आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांचे विचार घेऊन नवयुवकांनी समाज कार्य करणे काळाची गरज आहे.विवाह समस्या व उपाय यावर आपले विचार मांडत विवाह समस्याला कारणीभूत कोण आहेत. यावर विचार करणे गरजेचे आहे, भावसार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम संघटित होऊन विचाराची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे असे अनेक विषयावर अध्यक्षीय भाषणातून रामदास पेंडकर तानुरकर यांनी आपले विचार मांडले.
प्रमुख पाहुणे उदय तेलकर यांनी आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले, भावसार गौरव गाथा हा ग्रंथ भावसाराच्या घराघरात राहिला पाहिजे तो एक इतिहासाचा ठेवा आहे.
संजय पेटकर (अध्यक्ष युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नवीन नांदेड) यांनी आपले विचार मांडताना म्हणाले गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थी कसा बनवता येतील. या गोष्टीचा विचार केला पाहिजे तसेच जेथे भावसार समाज मंदिर/जागा आहे तेथे वाचनालय,अभ्यासिका, वसतिगृह ची व्यवस्था झाली पाहिजे, समाजात संघटनांमध्ये होत असलेली विचारांची विभिन्नता यावर आपले विचार मांडले.
भावसार सेनेचे उपाध्यक्ष सौ.कल्पना पुरनाळे यांनी आपल्या मधुर स्वरात गणेश वंदना व श्री हिंगलाज माताची वंदना गीत गाऊन आपल्या सूत्रसंचालनाची सुरुवात केले. त्यांच्या सूत्रसंचालनाच्या कलेमुळे कार्यक्रमाला शोभा आणण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले.
याप्रसंगी चंद्रकांत बुलबुले, रवींद्र पेंडकर, रमेश पुरनाळे,विजय कुसुमकर, प्रकाश गोजे, रमाकांत लोखंडे ,विकी बनसोडे, सौ कुसुमकर मंगला, सौ. रुक्मीन पेंडकर,सौ. विद्या पेटकर,श्रीमती साधना उखळे,सौ. सारिका कुसुमकर इत्यादी अनेक भावसार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.