ताज्या घडामोडी

जयराम आत्माराम पाटील हे दि रयतसेवक को-आँपरेटिव्ह बँक लिमिटेड,सातारा बँकेच्या अंत्यत चुरशीच्या लढतीत २८७५मते घेवून विजयी

Spread the love

सांगली, दि.१९ःरयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा ता वाळवा येथील रयत सेवक जयराम आत्माराम पाटील हे दि रयतसेवक को-आँपरेटिव्ह बँक लिमिटेड,सातारा बँकेच्या अंत्यत चुरशीच्या लढतीत २८७५मते घेवून विजयी झाले असून त्यांची सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातून संचालक मंडळात निवड झाली आहे.
रयत बँकेचे संचालक १६ जिल्ह्यातून निवडले जाते या वेळी रयत सेवक संघ, रयत मित्र मंडळ, रयत स्वाभिमानी कल्याणकारी मंडळ अशा तीन पॅनेल मध्ये अंत्यत चुरशीच्या लढतीत जयराम पाटील यांनी हा विजय खेचून आणला. ते बहे ता वाळवा येथील असून रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर पदी कार्यरत आहेत.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!